
अवनी वाघिणीची हत्या ? - मनेका गांधी दुःखी
अवनी या वाघिणीची ज्या निर्दयी पद्धतीने हत्या करण्यात आली, त्याचे मला अतीव दु:ख होत आहे. ही हत्याच आहे, हा गुन्हा आहे. असे ट्विट केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी केले आहे.
दोन वर्षांत १३ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा ठपका असलेल्या पांढरकवडय़ातील ‘टी-१’ या पाच वर्षांच्या वाघिणीला गोळ्या घालून ठार करण्यात आले. याचे अतीव दुःख गांधी यांना झाले आहे.
त्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वन खात्याला फैलावर घेतले आहे. वाघिणीवर गोळी झाडणाऱ्या नवाब शआफ़तअली खान याच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. आतापर्यंत त्यांनी तीन वाघ, शेकडो बिबटे आणि वन्य जिवांची हत्या केली आहे.प्रत्येकवेळी ते हैदराबाद येथील नेमबाज नवाब शआफ़तअली खानचा वापर करतात. यावेळी खानने त्याच्या मुलालाही बरोबर घेतले होते. त्याच्या मुलाला हा अधिकार नाही. हे बेकायदा कृत्यच आहे.
त्या वाघिणीला पकडण्याऐवजी एखाद्या नेमबाजाच्या हातून या वाघिणीची हत्या करण्यात आली आहे.ही हत्याच असल्याचा उल्लेख मनेका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये सातत्याने केला आहे. यासाठी त्यांनी ‘ शआफ़तअली खानवर त्यांनी गंभीर आरोप केले. खानने आतापर्यंत ३ वाघिणी किमान १० बिबटे, काही हत्ती आणि ३०० हून अधिक जंगलातील प्राण्यांना मारले आहे. देशद्रोही लोकांना शस्त्रे पुरवणे आणि हैदराबाद येथील एका खून प्रकरणातील तो संशयित आरोपी आहे. तरीही सरकार त्यालाच नेहमी हे काम का देते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे प्रकरण मी वरपर्यंत नेणार आहे, असेही त्या म्हणाल्या.